Posts

Showing posts with the label राजकारण

सह्याद्री वाहिनी 07.02.2021

सह्याद्री वाहिनी 07.02.2021 विशेष चर्चा - श्री प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र माझे मनोगत सह्याद्री वाहिनी वरील उत्तम मुलाखत पाहीली. प्रसार माध्यमातून खलिस्तान्यांनी व दुर्दैवाने देशाच्या काही प्रमुख राजकीय पक्षांनी चालवलेल्या युद्धाबद्दल तपशीलवार माहिती आणि योग्य उपाय सोप्या भाषेत मांडले आहेत. हा विषय गंभीर तर आहेच तसच भारताच्या सुरक्षेशी निगडित असल्याने अति महत्वाचा आहे. हे युद्ध एकतर्फी होऊ नये म्हणून आपण केलेल्या सूचना अमलात आणणे गरजेचे आहे. देश विघातक शक्तींना त्यांचेच तंत्र वापरून सायबर लढयात रोखणे व हरवणे भारतास करावे लागेल. तंत्रज्ञान आहेच पण त्याचा कुशलतेने वापर आमच्या संरक्षण एजंसिज कश्या प्रकारे करतात ह्याच्या कडे भारतीयांचे लक्ष्य राहील. ह्या लढाईच्या पहिल्या झुंजीत शत्रू वरचढ झाला असे दिसले तरीही ही फक्त सामन्याची सुरवात आहे. आपल्या सारख्यांच्या मुलाखतींचा वापर जन जागृती साठी सरकार करेल अशी आशा आहे.